तुकाराम महाराजांच्या बदनामीबद्दल माफी मागावी 

तुकाराम महाराजांच्या बदनामीबद्दल माफी मागावी 

ठाणे : संभाजी महाराजांच्या बदनामीचे मोहोळ शांत होते न होते तोच आता नव्याने संत तुकाराम महाराज यांच्या पत्नीची बदनामी सर्व शिक्षा अभियानामध्ये करण्यात आली आहे. या सर्व प्रकाराकडे पाहिल्यास सर्व शिक्षा अभियान म्हणजे महापुरुषांच्या बदनामीचे कारस्थान झाले आहे की काय, अशी शंका निर्माण होत आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

दरम्यान, महापुरुषांच्या बदनामीप्रकरणी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी महाराष्ट्राची माफी मागून राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. संभाजी महाराज हा दारूच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता, असा वादग्रस्त उल्लेख राज्य सरकारच्या सर्व शिक्षा अभियानाच्या समर्थ रामदास स्वामी या पुस्तकात सापडल्याने नव्या वादाला तोंड फुटले होते. या पुस्तकात छापलेल्या या मजकूराविषयी आव्हाड यांनी आक्षेपही घेतला होता. यानंतर आता राज्य सरकारच्या पुस्तकातून संत तुकाराम महाराजांच्या पत्नीची बदनामी करण्यात आली आहे. 

सर्व शिक्षा अभियानात "संतांचे जीवन प्रसंग' या पुस्तकाचा समावेश असून, हे पुस्तक गोपीनाथ तळवलकर यांनी लिहिले आहे. साठे यांनी संभाजी महाराजांची बदनामी केल्यानंतर आता तळवळकरांनी जगद्‌गुरु तुकारामांच्या पत्नीची बदनामी केली आहे. सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकांमधून महापुरुषांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न सुरू झालेला आहे. हा प्रकार काय आहे? सर्व शिक्षा अभियान म्हणजे महापुरुषांच्या बदनामीचे कारस्थान झाले आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही पुस्तके मुलांच्या हातात पडण्यापूर्वी वाचायला हवीत; शिक्षणमंत्र्यांना आपल्या खात्यामध्ये काय चालले आहे, हेच माहीत नाही. त्यांनी या प्रकरणात महाराष्ट्राची माफी मागून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com