जुन्या भांडणाच्या रागातून दोघांवर प्राणघातक हल्ला

जुन्या भांडणाच्या रागातून दोघांवर प्राणघातक हल्ला

नवी मुंबई : येथील शिवाजीनगर झोपडपट्टीत काही गुंड प्रवृत्तीच्या पाच ते सहा तरुणांनी जुन्या भांडणाच्या रागातून दोघा तरुणांवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी (ता. 8) रात्री घडली. या हल्ल्यात एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, तर दुसरा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर नेरूळ पोलिसांनी हल्लेखोर तरुणांपैकी तिघांना ताब्यात घेतले आहे.

या घटनेत मृत पावलेल्या तरुणाचे नाव राजेश इंगळे (25) तर जखमी झालेल्या त्याच्या सहकाऱ्याचे नाव वैभव सुरेश सदावर (24) असे आहे. मृत राजेश आणि जखमी वैभव या दोघांचे गत नवरात्रीमध्ये अविनाश जाधव, ओमकार राठोड, अमित आणि इतरांसोबत भांडण झाले होते. तेव्हापासून त्यांच्यामध्ये धुसफूस सुरूच होती. दरम्यान, शुक्रवारी रात्री आरोपी अविनाश जाधव, ओमकार राठोड, अमित आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी राजेश आणि वैभव या दोघांना भांडण मिटवण्यासाठी बोलावून घेतले; मात्र भांडण मिटण्याऐवजी अधिकच वाढत गेले.

पुन्हा वादावादी झाल्यानंतर आरोपींनी राजेश आणि वैभव या दोघांच्या हातावर, पोटावर व छातीवर चाकूने वार केले. या हल्ल्यात राजेश आणि वैभव दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान शनिवारी सकाळी राजेश इंगळे याचा मृत्यू झाला. त्यानंतर नेरूळ पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्यापैकी अविनाश जाधव, ओमकार राठोड, अमित या तिघांना ताब्यात घेतले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com