बाणगंगा तलावाचे सौंदर्य कोमेजले

बाणगंगा तलावातील पाणी रोजच टाकल्या जाणाऱ्या  निर्माल्यामुळे दूषित झाले आहे.
बाणगंगा तलावातील पाणी रोजच टाकल्या जाणाऱ्या निर्माल्यामुळे दूषित झाले आहे.

मुंबई - प्रभू श्रीरामाचे चरणस्पर्श झालेला वाळकेश्‍वरमधील बाणगंगा तलाव सध्या निर्माल्य आणि कपडे धुतले जात असल्याने मैला झाला आहे. अनेक वर्षांपासून बाणगंगेच्या सुशोभीकरणासाठी घोषणाबाजी केली जाते... प्रकल्पही राबवले जातात; परंतु प्रत्यक्षात परिस्थिती काही बदललेली नाही. हेरिटेज दर्जा असलेला बाणगंगा तलाव आजही दुर्लक्षित असून, अस्वच्छतेच्या विळख्याने त्याचा श्‍वास कोंडला आहे.

बाणगंगा परिसरात येत्या शुक्रवारी दीपोत्सव होणार असल्याने सध्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, तलावातील पाणी दूषितच आहे. पाण्यात निर्माल्य अविरत सोडले जाते. तलावाच्या काठावर कपडेही धुतले जात असल्याने पाणी दूषित झाले आहे. समुद्रापासून काही पावलांच्या अंतरावर असलेल्या बाणगंगा तलावातील पाणी गोड आहे; परंतु अस्वच्छतेमुळे ते दूषित झाले आहे. 

तलावाच्या बाजूला असलेल्या मोडकळीस आलेल्या भागाची डागडुजी सुरू आहे. तरीदेखील बाणगंगेच्या पाण्याच्या तळाशी असलेल्या पायऱ्यांची दुरवस्था आहे. बाणगंगेच्या काठावर मोठ्या प्रमाणात पूजा आणि श्राद्ध विधी होत असतात. त्याचे निर्माल्य पाण्यातच सोडले जात असल्याने तलावाची रया गेली आहे.

एका आख्यायिकेनुसार सीतेचा शोध घेत असताना राम आणि लक्ष्मण बाणगंगेच्या ठिकाणी थांबले होते. रामाला तहान लागल्यावर लक्ष्मणाने बाण मारून तळे तयार केले. शिलाहार राजाच्या काळात त्यांचे मंत्री लक्ष्मण प्रभू यांनी ११२७ मध्ये बाणगंगा तलाव बांधले. त्यानंतर १७१५ मध्ये मोठी डागडुजी करण्यात आली.

बदकांची विष्ठा घातक 
बाणगंगा तलावात बदकांचा मुक्त संचार असतो; मात्र त्यांची विष्ठा तलावाच्या पायऱ्यांवर पडलेली असते. त्याची दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरलेली असल्याने पर्यटक नाराजी व्यक्त करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com