राजकीय पक्षांकडून विश्‍वासघात!

राजकीय पक्षांकडून विश्‍वासघात!

मुंबई : राज्यात सरकार बनवण्यासाठी शिवसेना भाजपलाच परवानगी द्यावी, अन्य कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करु देऊ नये, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात आज दाखल करण्यात आली. निवडणुकीपूर्वी केलेली युती तोडून शिवसेना-भाजपने मतदारांचा विश्‍वासघात केला आहे, असेही याचिकादार गृहिणीचे म्हणणे आहे.

कळव्यात राहणाऱ्या प्रिया चौहान या गृहिणी असलेल्या याचिकादाराने ॲड. नितीन सातपुते यांच्यामार्फत याचिका केली आहे. विधानसभा निवडणुकीआधी शिवसेना आणि भाजपने युती जाहीर केली होती. त्यामुळे मतदारांनी त्यांच्यावर विश्‍वास ठेवून त्यांच्या पक्षांना बहुमत दिले; मात्र निवडणुकीनंतर दोन्ही पक्षांमध्ये वाद झाले आणि युती फुटली; मात्र यामुळे मतदारांचा विश्‍वासघात झालेला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणीही याचिकेत केली आहे. सध्या अस्तित्वात असलेले भाजप-अजित पवार गटाच्या सरकारलाही कामापासून प्रतिबंध करावा आणि नव्याने युतीचे सरकार स्थापन करावे, अशी मागणीही याचिकेत केली आहे.

याचिकेवर लवकरच नियमित न्यायालयात सुनावणी होण्याची शक्‍यता आहे. राज्यपालांनी तडकाफडकी राष्ट्रपती राजवट हटवून भाजपचे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री; तर पवार यांना उपमुख्यमंत्री म्हणून शपथ दिली आहे; मात्र संख्याबळ अधिक असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसने केला आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com