'जय श्रीराम'ची सक्ती करणाऱ्यांना भीम आर्मी देणार चोप

'जय श्रीराम'ची सक्ती करणाऱ्यांना भीम आर्मी देणार चोप

मुंबई : काही समाजकंटक समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा समाजकंटकांना चोप देण्याचा इशारा भीम आर्मीने दिला आहे. औरंगाबादमध्ये 'जय श्रीराम' बोलण्याची सक्ती करत काही अल्पसंख्यांक तरुणांना मारहाण करण्यात आली होती. यावरून भीम आर्मीने हा इशारा दिला. 

भारत देशात लोकशाही जीवंत आहे. भारत देशात सर्व जाती धर्माचे लोक राहतात. सर्वांना आपआपल्या धर्माचे स्वातंत्र्य दिले आहे. असे असताना काही समाजकंटक अल्पसंख्यांक लोकांना जबरदस्ती जय श्रीराम बोलण्याची सक्ती करत आहेत. त्याचा जीव घेत आहे. याचा भीम आर्मीने निषेध केला. 

यापुढे जो जय श्रीराम बोलण्याची जबरदस्ती करेल, त्यांना भीम आर्मी चोप देऊन त्याचे तोडं काळे करून गाढवावर धिडं काढणार आणि त्यांना पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याचा इशारा भीम आर्मी भारत एकता मिशनचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख अशोक कांबळे यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com