मुंबई - कोरोनाच्या संवेदनशील परिस्थितीत महाराष्ट्रातील राजकारण तापलंय. अशात आज राजभवनावर भेटीगाठींचा सिलसिला पाहायला मिळाला. आज \सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. ही भेट अर्धा तास सुरु होती. त्यानंतर भाजप नेते नारायण राणे यांनी राज्यपालांची भेट घेतली. ही ५० मिनिटं होती. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि महाविकास आघाडीवर आगपाखड केलीये.
महाराष्ट्रातील ठाकरे सरकार हे कोरोनाची संवेदनशील परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरली आहे, या सरकारची कोरोना परिस्थिती हाताळण्याची क्षमता नसल्याचं राणे म्हणालेत. महत्त्वाची बाब म्हणजे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी असंही राणे म्हणालेत.
महाविकास आघाडीचं सरकार लोकांचा जीव वाचवण्यास सक्षम नाही असा घणाघात नारायण राणे यांनी केलाय. या सरकारचा कसलाही अभ्यास नाही, सरकारी अधिकाऱ्यांना कसं सांभाळायचं पोलिसांची कशी काळजी घायची, यामध्ये सरकार अपयशी ठरलंय अशीही टीका नारायण राणे यांनी केलीये.
महाराष्ट्रात रुग्णसंख्या ५० हजारांच्यावर आहे. राज्यात हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा कोरोनामुळे जीव गेलाय. अशात नारायण राणे यांनी राज्यपालांकडे महापालिका आणि राज्य सरकारच्या ताब्यातील रुग्णालयं लष्कराच्या ताब्यात देण्यात यावेत अशीही मागणी नारायण राणे यांनी केलीये. लष्कराच्या ताब्यात केवळ रुग्णालये नव्हे तर राज्य का देऊ नये? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच्या सरकारची कोरोनाशी सामना करण्याची क्षमता नाही, त्यामुळे या सरकारला नारळ द्यावा आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी नारायण राणे यांनी केलीये.
BJP leader narayan rane demands for presidential rule in maharashtra
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.