सीबीएसई परीक्षा होणार सोपी

CBSE-Board
CBSE-Board

मुंबई - दहावी व बारावीच्या प्रश्‍नपत्रिकांचे स्वरूप बदलून परीक्षा अधिक सोपी करण्याचा निर्णय केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) घेतला आहे. त्यानुसार वस्तुनिष्ठ प्रश्‍नांचे प्रमाण 15 टक्‍क्‍यांवरून 25 टक्‍क्‍यांपर्यंत वाढवले जाणार आहे.

"सीबीएसई'ने दहावी व बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांसाठी सोप्या बनवण्याचे ठरवले आहे. विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्‍न अधिक विचारण्यात येणार आहेत. त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला प्रश्‍नाच्या उत्तराबाबत शंका असल्यास किंवा त्याला उत्तर येत नसल्यास 33 टक्के अधिक प्रश्‍न उपलब्ध असतील. प्रत्येक प्रश्‍नपत्रिकेत दोन भाग असतील; एका भागात वस्तुनिष्ठ आणि दुसऱ्या भागात अन्य प्रश्‍न असतील. या वर्षी बारावीच्या परीक्षेसाठी सुमारे 13 लाख आणि दहावीच्या परीक्षेसाठी 18 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com