नागरिकांनी डोळसपणे मतदान करण्यासाठी बाहेर पडावे - मनोज सिन्हा

नागरिकांनी डोळसपणे मतदान करण्यासाठी बाहेर पडावे - मनोज सिन्हा

कल्याण - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावर पुन्हा बसवण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे मत महत्वाचे आहे. बुध्दिजीवी वर्गाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आहे. म्हणूनच त्यांनी डोळसपणे मतदान करण्यासाठी बाहेर पडावे असे आवाहन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी केले आहे. कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार यांनी आयोजित केलेल्या बुध्दिजीवी संमेलनात सिन्हा बोलत होते. 

मंगेशी बॅन्क्वेट हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला फिल्मसिटीचे संचालक अमरजीत मिश्रा, खासदार कपिल पाटील, आमदार नरेंद्र पवार उपस्थित होते. 

बुध्दिजीवी वर्गाने केवळ राजकिय चर्चांवरच न थांबता देशाला दिशा देणाऱ्या निवडणुकीत मतदानालाही बाहेर पडावे असे आवाहन सिन्हा यांनी केले. 2004 मध्ये अटलबिहारी वाजपेयी पुन्हा पंतप्रधान होतीलच या विश्वासामुळे गाफील राहिल्याने पक्षाला सत्ता गमवावी लागली होती. याची आठवण त्यांनी याप्रसंगी उपस्थितांना करुन दिली. गेल्या पाच वर्षांत केंद्रातील सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा त्यांनी यावेळी मांडला. पहिली पाच वर्षं सामान्य नागरिकांना प्रार्थमिक सुविधा देण्यात खर्ची पडली आहेत. आता पुढील काळात नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी काम करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नजिकच्या भविष्यात जगात भारताचे स्थान उंचावण्याची शक्यता निर्माण झाली असून आर्थिक विकासाचा वेग प्रचंड वाढला आहे. ही सर्व प्रगती केंद्रातील सरकारच्या निर्णयामुळे होत असल्याचे सिन्हा यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com