रिक्षाचे २२ आणि टॅक्‍सीचे ३० रुपये किमान भाडे!

रिक्षाचे २२ आणि टॅक्‍सीचे ३० रुपये किमान भाडे!

मुंबई - सीएनजी दरवाढीचे कारण पुढे करत टॅक्‍सीचे किमान भाडे २२ वरून ३० रुपये आणि रिक्षाचे किमान भाडे १८ वरून २२ रुपये करण्याची मागणी चालकांच्या संघटनांनी केली आहे. तसे पत्र मुंबई टॅक्‍सीमेन्स युनियनने परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना दिले आहे. या मागणीबाबत १५ दिवसांत निर्णय न झाल्यास संपाचा इशारा या संघटनेने दिला आहे.

मागील तीन वर्षांत टॅक्‍सीच्या भाड्यात वाढ झालेली नाही. परंतु, सीएनजीच्या दरांत ऑगस्ट २०१७ पासून आतापर्यंत पाच वेळा वाढ झाली आहे. सीएनजीचा दर २ ऑगस्ट २०१७ रोजी किलोमागे ३२ पैशांनी वाढला, त्यानंतर तीन वेळा दरवाढ झाली आणि या ३ एप्रिलला तर सीएनजी किलोमागे एक रुपया ९६ पैशांनी महागले. या दरवाढीमुळे टॅक्‍सी आणि रिक्षा चालकांच्या खिशाला कात्री लागत आहे. सीएनजी महागल्यामुळे अन्य खर्च वाढला असून, वाहन विमासाठी जादा रक्कम मोजावी लागत असल्याचे या संघटनांचे म्हणणे आहे.

सरकारने नेमलेल्या खटुआ समितीनेही २०१७ मध्ये टॅक्‍सीच्या किमान भाड्यात एक रुपयाने वाढ करण्याची शिफारस केली होती. ती शिफारस लागू करण्यात आलेली नाही.
- ए. एल. क्वाड्रोस, सरचिटणीस, मुंबई टॅक्‍सीमेन्स युनियन

मुंबईतील रिक्षा-टॅक्‍सी
रिक्षा - एक लाख आठ हजार किमान भाडे - १८ रु. (मागणी २१ रु).
टॅक्‍सी - ३५ हजार 
किमान भाडे - २२ रु. (मागणी २५ रु.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com