नारळी भात महागला

नारळी भात महागला
नारळी भात महागला

मुंबई : श्रावण महिन्यातली पौर्णिमा अर्थात नारळी पौर्णिमा म्हटलं की खवय्यांच्या जिभेवर नारळी भाताची चव तरळते. पण यंदा नारळी भाताचा बेत सर्वसामान्यांसाठी महाग ठरणार आहे. घाऊक बाजारात नारळाच्या दरात दोन ते तीन रुपयांनी वाढ झाली असतानाच तांदळाच्या किमतीतही किलोमागे तीन ते चार रुपयांची वाढ पाहायला मिळत आहे. 

वाशी येथील एपीएमसी मार्केटमधील बिगर बासमती तांदळाची आवक घटल्याने गेल्या काही दिवसांत तांदळाच्या दरात किलोमागे वाढ झाली आहे. तांदळाची आवक कमी होण्यामागे पावसाच्या विश्रांतीचे कारण एपीएमसीतील घाऊक व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे. पुढेही तांदळाची आवक वाढण्याची चिन्हे नसल्याने तांदळाचे दर चढेच राहण्याची शक्‍यता आहे; तर श्रावण म्हटला की सणासुदीचा, उपासतापासाचा महिना. त्यामुळे या काळात अधिक मागणी असल्याने नारळाचा भावही वधारला आहे. 

छोटा नारळ शेकड्यामागे 750 रुपयांना, तर मोठा नारळ 2800 रुपयांना घाऊक बाजारात येत आहे. जास्त मागणी असलेला मध्यम आकाराच्या नारळाचा दर घाऊक बाजारात साडे बारा रुपये असल्याची माहिती, एपीएमसी कार्यालयातून देण्यात आली. 

नारळाचे दर नगामागे दोन ते तीन रुपयांनी वाढले असून, किरकोळ बाजारात 25 रुपयांवरून 28 ते 30 रुपयांपर्यंत नारळ मिळत आहे. पुढे गणेशोत्सव, नवरात्रीदरम्यानही नारळाचे दर चढे राहण्याची शक्‍यता आहे, असे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे. 

गुजरात, आंध्रप्रदेश, महाराष्ट्रातून बिगर बासमती तांदूळ एपीएमसीत येतो. अनेक ठिकाणी चांगला पाऊस न झाल्याने तांदळाची लागवड कमी झाली. परिणामी पुढे आवकही घटण्याची चिन्हे आहेत. 
- अश्‍विन मांगे, घाऊक विक्रेते 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com