किमान वेतनवाढ ही कामगारांची थट्टा; काँग्रेसची टीका

Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar

मुंबई : राज्य सरकारने कामगारांचे किमान वेतन दुप्पट करण्याबाबत घेतलेला निर्णय फसवा असून ही वेतनवाढ दिल्ली, त्रिपुरा आणि कर्नाटक राज्याच्या तुलनेत खूपच कमी आहे. निवडणुकीच्या तोंडावर कामगार वर्गाला खूश करण्यासाठी केलेली व्यर्थ धडपड असल्याची टीका विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आज (शुक्रवार) केली.

किमान वेतन वाढीवर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार म्हणाले की, सरकारचा कार्यकाळ पूर्ण होत आला असून या वेतनवाढीचा कामगारांना काहीही फायदा होणार नाही. किमान 18 हजार रुपये वेतन असावे, अशी कामगार संघटनांची मागणी असताना सरकारने केलेली ही वाढ तुटपुंजी आहे. दुप्पट वेतन वाढीनंतर झालेले 343 रुपये सुद्धा इतर राज्यांच्या तुलनेत कमीच आहेत. दिल्लीत हेच वेतन 538 रुपये, त्रिपुरामध्ये 505 तर शेजारच्या कर्नाटकमध्ये 419 रुपये आहे. औद्योगिकदृष्ट्या प्रगतीशील महाराष्ट्राने केलेली ही वेतनवाढ कामगारवर्गाची थट्टा करणारी आहे. 

केंद्र सरकारने तर एक पाऊल पुढे टाकत किमान वेतन 178 रुपये केले आहे. जून 2017 मध्ये असलेल्या 176 रुपयांमध्ये केवळ दोन रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. किमान वेतन वाढ करताना कामगार व त्याच्या कुटुंबाच्या गरजा भागतील याचा विचार केला जातो. त्यासाठी चलनवाढीचा दरही विचारात घेतला जातो. परंतु कामगार मंत्र्यांनी जाहीर केलेले 178 रुपये किमान वेतन हे कोणत्याही प्रमाणित निर्देशांकाच्या आधारे निश्‍चित केलेले नाही. तसेच किमान राष्ट्रीय वेतन 375-447 रुपये म्हणजेच महिन्याला 9,750 रुपये ते 11,622 रुपये इतके असावे, या सरकारच्याच तज्ज्ञ समितीच्या शिफारशींकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याचे वडेट्टीवार यांनी निदर्शनाला आणून दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com