मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणी (National Herald Case) ईडीकडून गेल्या तीन दिवसांपासून कसून चौकशी केली जात आहे. ईडीच्या या चौकशीला काँग्रेसकडून जोरदार विरोध होत असून आज काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या अध्यक्षेतेखाली मुंबईतील हँगिंग गार्डने ते राजभवनावर मोर्चा काढण्यात येत आहे. त्यापूर्वी पोलिसांकडून राजभवन परिसरात कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, या मोर्चापूर्वी नाना पटोले यांनी बोलताना भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. (Congress Protest Rally In Mumbai)
पटोले म्हणाले की, गेल्या तीन दिवसांपासून राहुल गांधींची ईडीकडून सुमारे दहा-दहा तास चौकशी केली जात आहे. त्यामुळे केंद्रात बसलेल्या आंधळ्या, बहिऱ्या सरकारला जागं करण्यासाठी आजचा मोर्चा असून, हा जनतेचा आवाज आहे. राहुल गांधींवर ज्या पद्धतीने ही कारवाई केली जात आहे. त्या विरोधातील हे आंदोलन आहे. आतापर्यंतच्या आंदोलनात पोलिसांना सहकार्य करण्यात आलं असून हे तो अभी झाँकी है और बहोत बाकी है असेही पटोले यांनी सांगत भाजपकडून काँग्रेसच्या नेत्यांवर अशाच पद्धतीने कारवाई होत राहियास येत्या काळात तीव्र आंदोलनं केली जातील असा इशाराही त्यांनी दिला आहे.
गेल्या आठ वर्षांपासून देशाला संपवण्याचं काम भाजप सरकारनं केलं असून देशात गरीबी आणण्याचं पाप भाजपने केलं आहे. त्यामुळे देशातील जनतेच्या मनात भाजपविरोधात मोठा राग असून, हा राग आता उफाळून वर येण्यास सुरुवात झाली आहे. या सर्वांमध्ये भाजपची उलटी गिनती आता सुरू झाली असून, आता ती थांबवणं शक्य नाही.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.