कल्याण डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद

कल्याण डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे मंगळवारी (ता.7)शहरातील पाणीपुरवठा बंद  राहणार आहे. तशी अधिसुचना पालिकेने काढली आहे. पालिकेने जलवाहिकांच्या दुरूस्तीचे काम हाती घेतल्याने पाणी पुरवठा बंद राहणार आहे. पाणी पुरवठा सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत बंद राहणार आहे.

नियमित जलवाहिकांच्या दुरूस्तीचे कामामुळे पाणीपुरवठा बंद करण्यात येणार असल्याचे पालिकेचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांनी सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. 

उल्हासनगर, बदलापूर, कल्याण, ठाणे आणि नवी मुंबई शहराला उल्हास नदीचा पाणीपुरवठा होतो. नदीवरील पाणीपुरवठा प्रकल्पाच्या पाण्याची पातळी खोल गेल्याने तसेच, पाणी उपसा यंत्रणेच्या देखभालीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे कल्याण डोंबवली शहराचा पाणीपुरवठा बंद असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com