जिल्‍ह्यात पुरामुळे मत्स्य तलावांचे नुकसान

पुरामुळे तलाव पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
पुरामुळे तलाव पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

मुंबई : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील हजारो मत्स्य तलावातील मासे वाहून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा दावा मत्स्यपालक करत आहेत. 

जिल्ह्यात पेण, अलिबाग हे सर्वात जास्त मत्स्य तलाव असलेले तालुके आहेत. या दोन तालुक्‍यांत हजार ते दीड हजार मत्स्यतलाव असल्याची माहिती पेण तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र झेमसे यांनी दिली.

पेण तालुक्‍यातील हमरापूर, वाशी, वडखळ, कासू या चार विभागांत सुमारे ३० ते ३५ गावे आहेत. खारेपाटातील सर्व गावांत ६०० ते ७०० मत्स्य तलाव आहेत. मत्स्यतलावातील मत्स्यबीज मोठे झाले होते. श्रावण महिना संपताच माशांचे भाव वाढत असल्याने त्या वेळी मासे पूर्ण वाढीचे झाले असते. मात्र, पुरामुळे मत्स्यपालकांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.

एकरी आठ लाखांचे नुकसान 
एक एकर जागेत असलेल्या तलावात पावसाळ्याच्या शेवटी चार हजार किलो माशांचे उत्पन्न होते. या माशांचा सरासरी प्रतिकिलो भाव २०० ते २५० रु. किलो मिळतो. तलावातील मासे वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे प्रतिएकर आठ ते १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्हाभरात सुमारे तीन हजार ते चार हजार एकर मत्स्यतलाव आहेत. त्यामुळे नुकसानीचा आकडा कोट्यवधींमध्ये जाण्याची शक्‍यता आहे.

माझ्या तलावात पुराचे पाणी शिरल्याने तलावातील मासळी वाहून गेली. तीलपीया, रोहू, कटला, खडस अशा प्रकारची मासळी पाळली होती. सुमारे चार लाखांचे नुकसान झाले आहे.
चैतन्य पाटील, मत्स्यपालक, पेण 

मत्स्यतलावांच्या नुकसानीची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे किती तलावांचे व किती नुकसान झाले ते आताच सांगू शकत नाही.
- अभयसिंग शिंदे, सहायक आयुक्त, मत्स्यविभाग, अलिबाग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com