युतीवर 'हिमालय'चे संकट! मुंबईचा संताप निवडणुकीत भोवण्याची शक्‍यता 

BJP and Shivsena
BJP and Shivsena

मुंबई : एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरी, त्यानंतर अंधेरी येथील गोखले पूल दुर्घटना आणि आताची ताजी हिमालय पूल दुर्घटना... यातून दिसलेल्या हिमालयाएवढ्या बेपर्वाईमुळे सामान्य नागरिकांच्या मनात शासन आणि प्रशासनाविरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला असून, त्यांचा हा अगतिक संताप मतदान यंत्रांच्या माध्यमातून उफाळून येण्याची शक्‍यता केवळ राजकीय अभ्यासकच नव्हे, तर हे सामान्य मुंबईकरच व्यक्त करताना दिसत आहेत. उत्तर मुंबईचा अपवाद वगळता सर्वच लोकसभा मतदारसंघांतील बहुसंख्य नागरिकांनी मुंबईतील प्रशासकीय बेफिकिरीजन्य दुर्घटनांसाठी शिवसेना-भाजप युतीला जबाबदार धरले आहे. 

हिमालय पूल दुर्घटनेनंतर मुंबईतील विविध लोकसभा मतदारसंघांत फिरून सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील भावना जाणून घेण्याचा प्रयत्न "सकाळ'च्या टीमने केला. सत्ताधारी युती सरकारी अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवण्यास अपयशी ठरली असून, त्यांच्याच आशीर्वादामुळे अधिकाऱ्यांची बेफिकिरी वाढत असल्याचे मत या सर्वेक्षणादरम्यान मतदारांनी व्यक्त केले. नागरिक प्रामुख्याने सेनेच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत असून, निवडणुकीपूर्वी उद्‌घाटने, भूमिपूजन यांसाठी शहरभर फिरणारे ठाकरे कुटुंबीय दुर्घटनेनंतर कोठेच दिसले नाहीत, असा संतापही अनेकांनी व्यक्त केला आहे. 

अशी नोंदवली नाराजी 
- दक्षिण मुंबई - सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांतील सुमारे 80 टक्के नागरिकांनी युतीच्या विरोधात मतप्रदर्शन केले. 20 टक्के नागरिकांनी मात्र हा अपघातच असल्याचे सांगितले. 
- दक्षिण-मध्य मुंबई - सुमारे 80 टक्के नागरिकांनी शिवसेना-भाजपच्या बेफिकिरीमुळे दुर्घटना घडल्याचे नमूद करत लोकसभा निवडणुकीत मतांवर परिणाम होणार असल्याचे सांगितले. 20 टक्के नागरिकांनी निवडणुका होण्यास वेळ असल्याने फारसा परिणाम होणार नसल्याचे नमूद केले. 
- उत्तर-मध्य मुंबई - 50 टक्के नागरिकांनी युतीविरोधात मतप्रदर्शन केले. 
- उत्तर-पश्‍चिम मुंबई - 60 टक्के मतदारांनी शिवसेना-भाजप युतीला मतदान करणार नसल्याचे सांगितले. या दुर्घटनेला तेच जबाबदार आहेत, असे त्यांनी ठामपणे नमूद केले. 40 टक्के मतदारांनी प्रशासकीय दुर्लक्षामुळे हा अपघात घडला असून त्यात शिवसेना-भाजपची चूक नसल्याचे नमूद केले. 
- उत्तर मुंबई - 20 टक्के युतीला फटका बसेल, असे सांगितले. 40 टक्के मतदारांनी युतीच्या मतांवर फरक पडणार नसल्याचे सांगितले. इतरांनी मत देण्याचे टाळले. 
- ईशान्य मुंबई - 100 टक्के मतदारांनी शिवसेना-भाजपवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यातही शिवसेनेवर नागरिक मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करताना दिसले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com