राज्यातील दुष्काळ मानवनिर्मित - डॉ. राजेंद्र सिंह

राज्यातील दुष्काळ मानवनिर्मित - डॉ. राजेंद्र सिंह

ठाणे - राज्यात सरकारने जलयुक्त शिवारसारखी योजना राबवली असली, तरी दुष्काळ पडलेला आहे. योजना राबविताना ती सरकारी अधिकाऱ्यांनी नीटपणे न राबविल्याने राज्यात दुष्काळ पडला आहे. त्यामुळे या दुष्काळाला मानवनिर्मित दुष्काळच म्हणता येईल, अशा शब्दांत जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेवर टीका केली.   

राज्य सरकारला नोव्हेंबर महिन्यात दुष्काळ जाहीर करावा लागत असेल, तर ही चिंताजनक बाब आहे. आम्ही विविध ठिकाणी जलयुक्त शिवार योजना राबविली, असे आकडे सरकारकडून दिले जात आहेत. आकडे किती खरे किंवा खोटे, हे सांगता येणार नाही. मात्र, ही योजना सरकारी अधिकाऱ्यांनी व्यवस्थित राबवली नाही. 

योजना व्यवस्थित राबवली असती तर इतक्‍या मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला नसता. काही ठिकाणी या योजनेला यश आले; पण त्याच जिल्ह्यातील दुसऱ्या भागात मात्र ही योजना अपयशी ठरते. याचा अर्थ कंत्राटदारांनी चुकीच्या पद्धतीने कामे केली आहेत. कंत्राटदारांनी काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने खोदकाम केले आहे. त्यामुळे पर्यावरणाचीही हानी झाली. अशा योजनांत भ्रष्टाचार होण्याचीही शक्‍यता असते, असेही राजेंद्र सिंह म्हणाले. 

सरकारमुळे आदिवासींमध्ये भीती
शेतकरी बांधवांचा अधिकार हिरावलेला असून तो आंदोलनातूनच मिळविता येईल, असेही सिंह म्हणाले. हे सरकार खोट्यांचे आहे. त्यामुळे अशा खोट्यांना त्यांच्या जागेवरून हलविणे गरजेचे आहे. आज लोकांकडून पाण्याचा अधिकार हिरावून घेतला आहे. सरकारने आदिवासी बांधवांमध्ये भीती निर्माण केली आहे. ती भीती आम्हाला दूर करायची असल्याचेही ते म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com