बलशाली महाराष्ट्रासाठी सर्वांनी एकत्र यावे - सी. विद्यासागर राव

Maharashtra-Day
Maharashtra-Day

मुंबई - महाराष्ट्र हे देशांतर्गत; तसेच विदेशी गुंतवणुकीसाठी सर्वाधिक आकर्षणाचे ठिकाण असून देशाचे आर्थिक शक्तिकेंद्र आहे. देशाच्या पायाभूत विकासामध्ये महाराष्ट्राने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे बलशाली महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५९ व्या वर्धापनदिनी केले. 

महाराष्ट्र दिनाचा मुख्य सरकारी सोहळा बुधवारी शिवाजी पार्क येथे राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत झाला, त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मुख्य सचिव यू. पी. एस. मदान, पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, आदी उपस्थित होते. या वेळी राज्यपालांनी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या; तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या वेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव म्हणाले, की महाराष्ट्र शेती, औद्योगिक उत्पादने, व्यापार आणि दळणवळण क्षेत्रात देशातील आघाडीचे राज्य आहे. देशातील अत्यंत विकसित आणि समृद्ध राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश होतो.

महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचे राज्य बनविण्यामध्ये मुंबईचे फार मोठे योगदान आहे. नागपूर, कोल्हापूर आणि सोलापूर ही शहरेदेखील विकासाची शक्तिकेंद्रे असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com