मुंबई : नाणारचा विषारी राक्षस घालवल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले.
कोकणातील जनतेच्या एकजुटीचा आणि संघर्षाचा हा विजय असून सरकारला लोकभावनेचा आदर करावाच लगला, असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘शिवसेनेने विकासाला कधीच विरोध केला नाही. नाणारसारखे प्रकल्प निसर्ग, पर्यावरण, शेती, फळबागांचा विध्वंस करतील व त्या विरोधात कोकणची जनता उभी राहिली. शिवसेनेने कोकणी जनतेला साथ दिली. नाणार प्रकल्प मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात इतरत्र कुठेही न्यावा.
प्रकल्पाला विरोध असण्याचे कारण नाही. या प्रकल्पाचे कोणी स्वागत करणार असेल तर आमची काहीच हरकत नाही. पण लोकांचा विरोध असेल तर शिवसेना नक्कीच लोकांबरोबर राहील’, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुखांनी व्यक्त केला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.