फळांची आवक निम्म्याने घटली

फळांची आवक निम्म्याने घटली
फळांची आवक निम्म्याने घटली

नवी मुंबई : नवरात्रोत्सवात अनेकांचे नऊ दिवसांचे उपवास असल्याने या काळात फलाहार करण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यामुळे बाजारात फळांना मोठी मागणी असते. या वेळी देखील बाजारात फळांना मोठी मागणी आहे. मात्र, ही मागणी पूर्ण करता येईल इतकी फळे बाजारात येत नसल्याने फळांच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

पावसामुळे फळांच्या बागांवर झालेल्या परिणामामुळे बाजारात फळांची आवक निम्म्यावर आली आहे. उत्पादन नसल्याने बाजारात फळे पाठवणे शेतकऱ्यांना सहज शक्‍य होत नाही. त्यामुळे दरवर्षीच्या मानाने या वर्षी फळांची आवक निम्म्याहूनही कमी झाली असल्याचे व्यापारी प्रवीण पाटील यांनी सांगितले. ऑक्‍टोबर महिन्यात पपई, खरबूज, कलिंगड, डाळिंब, सीताफळ या फळांची चांगली आवक होत असते. त्यामुळे मागणीइतका पुरवठा करणे व्यापाऱ्यांना सहज शक्‍य देखील होते. मात्र, या वेळी बाजारात मागणीइतका पुरवठा होत नसल्याने, ही मागणी पुरवणे व्यापाऱ्यांना शक्‍य होत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
 
नेहमीच्या तुलनेत सध्या फळांची आवक दुपटीने-तिपटीने कमी झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात गेल्या वर्षीच्या तुलनेत फळांचे दरही वाढलेले पाहायला मिळत आहेत. मागील वर्षी बाजारात नवरात्रोत्सवात ४०० गाड्यांची आवक होत होती. मात्र, यंदा हीच आवक २०० ते २५० गाड्यांवर आली आहे. अशी माहिती फळांचे घाऊक व्यापारी प्रवीण पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, किरकोळ बाजारात दर अधिकच वाढल्याची परिस्थिती आहे. मात्र, उपवास असल्याने लोक ही फळे खरेदी करण्यासाठी बाजारात येत आहेत. मात्र बाजारात पुरेशा प्रमाणात फळे मिळत नसल्याची परिस्थिती आहे.

सफरचंदाची चलती
बाजारात अन्य फळे नसली तरी भारतीय सफरचंदाची चांगली आवक होत असून, बाजारात केवळ सफरचंद अधिक प्रमाणात असल्याचे पाहायला मिळत आहे. सिमल्यावरून येणाऱ्या सफरचंदाचा हंगाम संपला असून, काश्‍मीर आणि किन्नोरमधून सफरचंदाची चांगली आवक होत आहे. त्यामुळे बाजारात सफरचंद मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत असून, घाऊक बाजारात ५० ते ८० रुपये किलोपर्यंत विकला जात आहेत. तर किरकोळ बाजारात सफरचंद ८० ते १०० रुपये प्रति किलो मिळत आहेत.

पावसामुळे फळांच्या बागांवर झालेल्या परिणामामुळे बाजारात फळांची आवक निम्म्यावर आली आहे. उत्पादन नसल्याने बाजारात फळे पाठवणे शेतकऱ्यांना सहज शक्‍य होत नाही. त्यामुळे दरवर्षीच्या मानाने या वर्षी फळांची आवक निम्म्याहूनही कमी झाली आहे.
- प्रवीण पाटील, व्यापारी.

फळे    मागील वर्षीचा दर    यंदाचा दर  (रुपये/प्रति किलो)
डाळिंब    ६० ते १२०    ८० ते १५० 
सीताफळ    ५० ते ८०    ७० ते १२०
पपई    १५ ते २५    २० ते ३५
कलिंगड    ७ ते १०    १० ते १५
खरबूज    १५ ते २५    २० ते ३५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com