मुंबईत गणरायाचे आगमन सोहळे रद्द

मुंबईत गणरायाचे आगमन सोहळे रद्द

मुंबई: मुंबईतील गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात आणि धुमधडाक्‍यात साजरा होतो. आगमन सोहळ्यांवरही मंडळे लाखो रुपये खर्च करतात. यंदा या खर्चाला कात्री लावत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे पूरग्रस्तांच्या मदतीला धावली आहेत. सामाजिक जाणिवेतून उत्सव साध्या पद्धतीने करण्यावर मंडळांनी यंदा भर दिला आहे. उत्सवासाठी मिळालेल्या रकमेतून पूरग्रस्तांना मदत केली जाणार आहे.

सांगली आणि कोल्हापूरला पुराचा वेढा पडला. पुराने घरांची पडझड झाली. संसार उद्‌ध्वस्त झाले आहेत. पूरग्रस्तांना मदतीची गरज असल्याने सर्व स्तरातून मदतीचा ओघ सुरू आहे. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे मागे नाहीत. ही मंडळे पूरग्रस्तांच्या मदतीला धावली आहेत. दर वर्षी मंडळे गणेशोत्सवावर कोट्यवधी रुपये खर्च करतात. यंदा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय मंडळांनी घेतला आहे. उत्सवासाठी मिळणारा निधी पूरग्रस्तांसाठी दिला जात आहे. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ऍड. नरेंद्र दहिबावकर यांनी गणेशोत्सव साध्या पद्धतीने करून पूरग्रस्तांना मदत करा, असे आवाहन केले होते. त्यामुळे त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत यंदा काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आगमन सोहळे रद्द केले आहेत. गणरायाच्या आगमन सोहळ्यासाठी गणेशभक्त मोठ्या देणग्या देतात. आगमन सोहळ्यासाठी आलेल्या देणग्यांची रक्कम यंदा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा मंडळांनी निर्णय घेतला आहे.

जल्लोष नाही, मदत जमा
यंदा आगमन मिरवणूक न काढता गणरायाचे आगमन होताना पूरग्रस्तांसाठी जीवनावश्‍यक वस्तू गोळा करण्यात आल्या. आज फोर्टच्या राजाच्या मिरवणूकीत मदत गोळा करण्यासाठी एक टेम्पो ठेवण्यात आला होता. त्यात जीवनावश्‍यक वस्तू स्वीकारल्या. या मंडळाने केलेल्या आवाहनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com