गृह विभागाने 'या' दलाला दिला सतर्कतेचा इशारा...

गृह विभागाने 'या' दलाला दिला सतर्कतेचा इशारा...
गृह विभागाने 'या' दलाला दिला सतर्कतेचा इशारा...

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक भाग सील करण्यात येत आहेत. त्यामुळे गृह विभागाने राज्य राखीव पोलिस दलाचे (एसआरपीएफ) गट क्रमांक 8 आणि 10 यांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार या रजेवर गेलेल्या जवानांना कामावर परत बोलावण्यात येत आहे. 

राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, मुंबईतील बाधितांचा आकडा 500 वर गेला आहे. देशात लॉकडाऊन असला, तरी अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे समूहसंसर्गाचा धोका अधिक वाढला आहे. लॉकडाऊनमुळे देशातील आर्थिक व्यवहार कोलडमडले असून, जनजीवन विस्कळित झाले आहे. हातावर पोट असलेल्या मजुरांना दोन वेळच्या जेवणाची सोय करण्यासाठी घराबाहेर पडण्याशिवाय पर्याय नसतो; मात्र अनेक बेजबाबदार व्यक्ती कारण नसताना फिरताना दिसत आहेत.

ही बातमी वाचली का? धक्कादायक..! लक्षणे नाहीत, मात्र, ते ठरतायेत कोरोनाचे वाहक 
 
सध्याच्या अभूतपूर्व स्थितीचा गैरफायदा घेत असलेल्या टवाळखोरांना चाप घालण्यासाठी मुंबई पोलिस कसून प्रयत्न करत आहेत. कोरोनाचे रुग्ण सापडत असलेले परिसर सील करण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची गरज भासत आहे. लॉकडाऊन 14 एप्रिलनंतर टप्प्याटप्प्याने उठवला जाण्याची शक्‍यता असल्याने गोंधळ उडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी राज्य राखीव दलाची अतिरिक्त कुमक बोलावण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने घेतला आहे. 

समादेशकांना आदेश 
सरकारकडून आदेश येताच राज्य राखीव दलाच्या समादेशकांनी गट क्रमांक 8 आणि 10 यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे कोणत्याही वेळी शहरात एसआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात येतील, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com