जनतेला घाबरवण्याचे सरकारचे काम - आव्हाड

जनतेला घाबरवण्याचे सरकारचे काम - आव्हाड

ठाणे - जनतेला घाबरवण्याचे सरकारचे काम सुरू आहे. सरकारविरोधात कोणीही काहीच बोलू नये, अशी अपेक्षा असणाऱ्यांनीच ही कारवाई केली असल्याची टीका गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. पुणे पोलिसांनी चौकशीसाठी अटक केलेल्या ॲड्‌. अरुण परेरा यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांच्या निवास्थानी स्थानबद्ध करण्यात आले. त्यावेळी आव्हाड हे त्यांना भेटण्यासाठी आले असताना आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना सरकारविरोधात टीका केली.

कथित नक्षलवादी असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी नुकतीच पाच जणांना अटक केली आहे. यात ॲड्‌. अरुण परेरा यांचाही समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी ६ सप्टेंबरपर्यंत या सर्वांना त्यांच्या निवासस्थानी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर गुरुवारी पहाटे परेरा यांना त्यांच्या घरी आणण्यात आले. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड हे परेरा यांना भेटण्यासाठी आले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com