ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम

Grampanchyat-Election
Grampanchyat-Election

मुंबई - राज्यातील २६४ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, त्यासाठी चार फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मतदान २४ फेब्रुवारीला घेतले जाईल. 

मार्च २०१९ मध्ये मुदत संपणाऱ्या, तसेच नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींसाठीचा हा निवडणूक कार्यक्रम आहे. या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया संगणकप्रणालीद्वारे राबविण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. रायगड जिल्ह्यातील ९० ग्रामपंचायती, रत्नागिरीमधील ४०, सिंधुदुर्गमधील १, अशा कोकण विभागातील १३१ ग्रामपंचायती, धुळे- १७, नगर- ३६ आणि नंदुरबारमधील ३, अशा नाशिक विभागातील एकूण ५६ ग्रामपंचायती, पुणे- २२, सोलापूर-५, सातारा-४० आणि कोल्हापूरमधील ५, अशा पुणे विभागातील एकूण ७२ ग्रामपंचायती, औरंगाबाद विभागांतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील २ ग्रामपंचायती, अमरावती जिल्हा व विभागातील २ ग्रामपंचायती, तर नागपूर विभागांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील १ ग्रामपंचायतीचा या निवडणूक जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com