हिरवा वाटाणा ३० ते ४० रुपये किलो

हिरवा वाटाणा ३० ते ४० रुपये किलो
हिरवा वाटाणा ३० ते ४० रुपये किलो

नवी मुंबई :  अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने भाज्यांची आवक रोडावली होती. मात्र आता ही आवक सुरळीत होत असून, बाजारात भाज्यांचे वाढलेले दर काही प्रमाणात कमी झालेले पाहायला मिळत आहेत. हिरव्या वाटाण्याचे दरही आवाक्‍यात आले असून, घाऊक बाजारात मागील महिन्यापर्यंत १०० रुपये किलो असणारा वाटाणा आता ३० ते ४० रुपये प्रतिकिलोपर्यंत खाली आला आहे. किरकोळ बाजारातही हिरवा वाटाणा ५० रुपये प्रतिकिलोपर्यंत मिळत आहे. 

नोव्हेंबर महिन्यात थंडीच्या हंगामात भाज्यांच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होत असल्याने, या काळात बाजारात चांगल्या दर्जाचा भाजीपाला मोठ्या प्रमाणात येतो. त्यामुळे भाज्यांचे दरही बऱ्यापैकी कमी झालेले असतात. मात्र, यावेळी अवकाळी पावसामुळे बाजारात योग्य प्रकारे भाजीपाला येऊ शकला नाही. मात्र, आता भाज्यांची आवक काही प्रमाणात सुधारली आहे. हिरव्या वाटाण्याची आवक वाढली असल्याने वाटाण्याचे दर ३० ते ४० रुपये प्रतिकिलोपर्यंत खाली आले आहेत. मागील महिन्यापर्यंत हे दर १०० रुपये प्रतिकिलोपर्यंत होते. मात्र, सध्या घाऊक बाजारात ३५ ते ४० गाड्या माल दाखल होत असल्याने, वाटाण्याचा दर ३० ते ४० रुपये प्रतिकिलोपर्यंत घसरला आहे. अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. किरकोळ बाजारातही पन्नास रुपये किलो दराने वाटाणा मिळत आहे. 

दरात आणखी घसरणीची शक्यता
मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेशसह स्थानिक बाजार समित्यांमधून काही प्रमाणात हिरवा वाटाणा बाजारात येत आहे. त्यामुळे आवक वाढली आहे. येत्या काही दिवसांत पंजाब, उत्तर प्रदेशमधूनही वाटाण्याची आवक सुरुवात होईल. त्यामुळे दरात आणखीनच घसरण होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com