चुकीचा इतिहास सांगणारे सत्तेत - हार्दिक पटेल 

चुकीचा इतिहास सांगणारे सत्तेत - हार्दिक पटेल 

अलिबाग (जि. रायगड) - सरदार पटेल, छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास सांगून चुकीचे लोक सत्तेत बसले आहेत. ते बहुजन, कष्टकरी समाजाचे आर्थिक शोषण करत आहेत. जे छत्रपतींचा राज्याभिषेक साजरा करत नाहीत, त्यांना छत्रपतींच्या नावाने मते मागण्याचा कोणताही अधिकार नाही. अशा मतलबी लोकांना बाहेर काढण्यासाठी बहुजन समाजाने मतभेद विसरून एकत्र यावे, असे आवाहन गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी व्यक्त केले. या वेळी हार्दिक यांनी राफेल गैरव्यवहार, आरक्षण, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या आदी मुद्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली.

संभाजी ब्रिगेडचे ९वे राज्यस्तरीय अधिवेशन अलिबागमध्ये शनिवारपासून सुरू झाले. या वेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जातीपातीचे राजकारण बाजूला ठेवून बहुजन समाजाने एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनीही पुढील काळात शाहू, आंबेडकर, जिजाऊ यांना मानणाऱ्या बहुजन समाजाने एकत्र येणे गरजेचे असल्याचे सांगितले. या अधिवेशनासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यासह मराठा सेवा संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने अलिबागमध्ये दाखल झाले आहेत.

भय, भूक, भ्रष्टाचाराचे ‘गुजरात मॉडेल’ 
सरदार पटेल यांच्या स्मारकाच्या नावाखाली गुजरातमधील  जनतेला ११ वर्षे मूर्ख बनविले. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या नावाखाली जनतेला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने सावध होणे गरजेचे आहे. ढोंगीपणा करून फक्त मते मिळविण्याचे काम या मोदींनी केले आहे. गुजरातची परिस्थिती अतिशय वाईट आहे. येथील ११ जिल्ह्यांत पाण्याचा दुष्काळ आहे. गुजरात हे भय, भूक व भ्रष्टाचाराचे मॉडेल बनले आहे, अशी टीका हार्दिक पटेल यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com