वसईत फुले उमलण्याआधीच मातीत

वसई ः पावसामुळे फुलशेतीत साचलेले पाणी.
वसई ः पावसामुळे फुलशेतीत साचलेले पाणी.

विरार ः जाई, जुई, मोगरा, सोनचाफा या फुलांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या वसईला पावसाने चांगलेच धुतल्याने उमलण्याआधीच फुलशेती पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाली आहे. वसईतील केळीच्या बागांनाही पावसाचा फटका बसला असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारने या बागांची पाहणी करून मदतीचा हात द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

गेल्या काही वर्षांत जाई, जुई, मोगऱ्याचे उत्पादन कमी झाले असताना सोनचाफ्याचे उत्पादन वाढले आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोनचाफ्याची लागवड झाली असली, तरी अजूनही काही ठिकाणी जाई, जुई, मोगरा, तगर, जास्वंदी अशा फुलांचे पीक घेण्यात येते. सध्या श्रावण सुरू असल्याने येथील फुलांना मोठी मागणी असते; मात्र मुसळधार पावसाने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

अनेक ठिकाणी मोगरा, जाई, जुईच्या वाद्या पाण्याखाली गेल्याने मृतावस्थेत गेल्या आहेत; तर सोनचाफ्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने त्याचा परिणाम झाडावर झाला असून फुले कमी येऊ लागली आहेत. त्यामुळे यंदा ऐन सणावारांच्या दिवसांत आवक घटल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. 

मुसळधार पावसामुळे येथील फुलशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सरकारने या ठिकाणचा पंचनामा करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा. 
रमेश वझे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, वसई 

यंदा श्रावणाच्या हंगामातच पावसाने थैमान घातल्याने फूल उत्पादकांवर उपासमारीची वेळी आली आहे. अनेक ठिकाणच्या फुलाच्या बागा उद्‌ध्वस्त झाल्या आहेत; तर सोनचाफ्याचे उत्पादन अर्ध्यापेक्षा कमी झाल्याने त्याचा फटका  बसला आहे.      किरण पाटील, फूल उत्पादक शेतकरी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com