उच्च न्यायालयाने घेतली दखल, दिले हे आदेश...

उच्च न्यायालयाने घेतली दखल, दिले हे आदेश...
उच्च न्यायालयाने घेतली दखल, दिले हे आदेश...

नवी मुंबई : महामुंबई क्षेत्रातील पाणथळ आणि खारफुटी नष्ट करण्याच्या वारंवार होत असलेल्या तक्रारींची दखल घेत उच्च न्यायालयाने नेमलेल्या खारफुटी देखरेख व पाहणी समितीने संबंधित ठिकाणांची तातडीने पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. या पाहणीचा अहवाल पंधरा दिवसांत द्यायचा असून, येत्या २३ डिसेंबर रोजी समिती त्याचा आढावा घेणार आहे. 

एमएमआरडीए क्षेत्रात खारफुटीची कत्तल करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तसेच भराव करून पाणथळ नष्ट करण्याचे प्रयत्नही होताना दिसतात. याबाबत विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल केले जातात; मात्र त्यापलीकडे कोणतीच कार्यवाही होताना दिसत नाही. गेल्या काही महिन्यांत जेएनपीटी व एनएमएसईझेड क्षेत्रात अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. या भागात झालेल्या भरावाची व खारफुटी तोडीची छायाचित्रे खारफुटी देखरेख व पाहणी समितीसमोर वनशक्ती संस्थेने सादर केली. नुकत्याच झालेल्या या बैठकीत भेंडखळ, पागोटे, बेलपाडा, पाणजे, चेंबूर, तसेच वाशीलगत सायन-पनवेल मार्ग येथे विकासाच्या नावाखाली होत असलेल्या पर्यावरणीय कायद्याच्या उल्लंघनाकडे समितीचे लक्ष वेधण्यात आले. याबाबत श्री एकवीरा आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार पवार यांनी सांगितले की, गेले कित्येक दिवस सुरू असलेल्या या प्रकारची गंभीर दखल समितीचे अध्यक्ष, कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड यांनी घेतली आहे. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार पहिला पाहणी दौरा आज (ता. १३) होणार आहे. अध्यक्षांनी ही बाब गांभीर्याने घेतल्याने खारफुटीच्या संरक्षणाबाबत काही भरीव उपाययोजना केल्या जातील, अशी आशा निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. 

कल्याण ऑनर किलिंग प्रकरणातील आरोपीकडून पोलिसांची दिशाभूल

पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या उरण परिसरातील पागोटे येथील सेझ हद्दीत जवळपास साडेतीन हजार खारफुटींच्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे; तर उरणजवळील राष्ट्रीय मार्गालागत असलेली जवळपास ५ हजार खारफुटीची झाडे पाण्याअभावी पूर्णपणे सुकून गेली. चेंबूर छेडानगर येथेही भूमाफियांनी शेकडो खारफुटीची तोड केली. ही सर्व प्रकरणे नेचर कनेक्‍ट व श्री एकवीरा आई प्रतिष्ठान, वनशक्ती संस्थेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनासही आणून दिली. तसेच यावर तातडीने कार्यवाही, उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. 

भेंडखळ, बेलपाडा, जासई येथे मोठ्या प्रमाणावर भराव टाकून पर्यावरणाची भरपूर हानी झाली आहे. या ठिकाणी झालेला कित्येक टन भराव लक्षात घेता त्यांचे पुनरुज्जीवन करणे हे संबंधित प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. 
- नंदकुमार पवार, अध्यक्ष, श्री एकवीरा आई प्रतिष्ठान  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com