मुंबईचा धोका टळला, उर्वरीत कोकणात मात्र पावसाचा अलर्ट कायम

मुंबईचा धोका टळला, उर्वरीत कोकणात मात्र पावसाचा अलर्ट कायम

मुंबई : मुंबईत होणाऱ्या अतिवृष्टीचा धोका टळला आहे. मात्र, कोकणावरील अतिवृष्टीचे संकट मात्र अद्यापही कायम आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यातील काही भागात शनिवार म्हणजेच १५ तारखेला, सोमवारी १७ तारखेलाआणि मंगळवारी १८ तारखेला अतिवृष्टी होण्याची शक्‍यता असून 204 मि.मी पर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. या तीन दिवसांसाठी दोन्ही जिल्ल्हयांमध्ये अंबर अलर्ट देण्यात आलेला. मात्र आता वेधशाळेच्या सुधारीत अंदाजानुसार मुंबईसाठीचा अंबर अलर्ट काढण्यात आला असून जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात 18 ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीची शक्‍यता असून काही भागात 204 मि.मी पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. या तिन्ही जिल्ह्यांसाठी अंबर अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नाविक दल, तटरक्ष दल तसेच स्थानिक प्रशासनाला सज्ज राहाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान मुंबईत आज मध्य मुंबई आणि पश्‍चिम उपनगरात जोरदार पाऊस झाला. शिवाजी पार्क परीसरात सर्वाधिक 68.6 मि.मी पाऊस नोंदविण्यात आला आहे. तर, वांद्रे येथे 66.8, मिलीमीटर, अंधेरी लोखंडवाला येथे 57.6 मिलीमीटर, बोरीवलीमध्ये 61.4 मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला आहे.

मुंबईत मंगळवार पर्यंत जोरदार पावसाचा अंदाज असून पुढील दोन दिवस 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहाण्याचा शक्‍यता आहे.

important news abour rain forecast in mumbai and konkan read full news

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com