मुंबई : ट्वेन्टी-२० प्रकारात मी भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये प्रथमच कर्णधार असलो तरी नेतृत्वाच्या जबाबदारीत फरक असणार नाही, असे हार्दिक पंड्याने सांगितले.
कौटुंबिक समारंभामुळे रोहित शर्माने मुंबईत उद्या होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातून माघार घेतली आहे, त्यामुळे हार्दिक प्रथमच एकदिवसीय संघाचा कर्णधार असणार आहे.
शेवटी हे व्हाईटबॉल क्रिकेट आहे. ट्वेन्टी-२० प्रकारात प्रत्येक चेंडूगणिक विचार करावा लागतो किंवा डावपेच बदलावे लागतात. ५०-५० षटकांच्या सामन्यात तसा वेळ असतो, तुम्ही आखलेले डावपेच काही काळ पुढे कायम ठेवू शकता, असे पंड्याने एकदिवसीय क्रिकेटमधील नेतृत्वाबाबत सांगितले.
कोणाची जागा घेणार नाही
जूनच्या सुरुवातीस भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना खेळणार आहे. हा सामना इंग्लंडमध्ये असल्याने हार्दिकचा समावेश करावा अशी मागणी केली जात आहे. हार्दिक प्रदीर्घकाळ कसोटीत खेळलेला नाही. यासंदर्भात विचारले असला तो म्हणाला, मी कोणाची जागा घेणार नाही. भारतीय संघातील जागा मी माझ्या क्षमतेनुसार मिळवलेली आहे आणि आता पुन्हा कसोटी संघात खेळायचे असेल तरी मी ही जागा मेहनत करून मिळवेन.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.