आयटीआयच्या प्रवेशप्रक्रियेला मुदतवाढ

आयटीआयच्या प्रवेशप्रक्रियेत वाढ
आयटीआयच्या प्रवेशप्रक्रियेत वाढ


मुंबई : राज्यातील पूरस्थितीचा फटका विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेलाही बसला आहे. पूरस्थितीमुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालय किंवा संस्थांमध्ये जाऊन प्रवेश घेणे अडचणीचे झाल्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) चौथ्या फेरीला आणि समुपदेशन फेरीतील प्रवेशप्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे.

राज्यातील पूरस्थितीमुळे चौथ्या फेरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संस्थेमध्ये जाऊन प्रवेश निश्‍चित करण्यात अडचण येत आहे. चौथ्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 13 ऑगस्टपर्यंत प्रवेश घेणे बंधनकारक होते; परंतु पूरस्थितीमुळे या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 16 ऑगस्टच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत कागदपत्रांची पडताळणी करता येणार आहे; तर 17 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजता समुपदेशन फेरीसाठी उपलब्ध जागांचा तपशील संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. समुपदेशन फेरी 18 व 19 ऑगस्टला होईल आणि त्याची गुणवत्ता यादी 19 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजल्यानंतर जाहीर करण्यात येणार आहे.

समुपदेशन फेरीत निवडलेल्या विद्यार्थ्यांनी 20 ते 23 ऑगस्टपर्यंत संस्थेत जाऊन आपले प्रवेश निश्‍चित करायचे आहेत. समुपदेशन फेरीनंतर शिल्लक जागांचा तपशील 24 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजता संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com