ममतादीदी कितीही प्रयत्न करू दे, राष्ट्रपती निवडणुकीत भाजपाचाच उमेदवार; कपिल पाटील

महागाई, ओबीसी आरक्षण याविषयी केंद्र सरकार नाही तर राज्य सरकार जबाबदार
Kapil Patil statement presidensial election will be bjp candidate mamata banerjee mumbai
Kapil Patil statement presidensial election will be bjp candidate mamata banerjee mumbaisakal

डोंबिवली - राष्ट्रपती पदाची निवडणुक जुलै महिन्यात होत असून, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशातील 22 विरोधी पक्ष नेत्यांना पत्र पाठवून बैठकीसाठी आमंत्रित केलं आहे. यावर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपाचाच विजय होणार आहे. ममतादीदी कितीही प्रयत्न करू दे. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी केवळ 1 टक्के मतांची आवश्यकता आहे. मोदींजीच्या नेतृत्वाखाली भाजप कोठूनही कोणालाही कन्व्हेन्स करू शकते असा विश्वास केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांनी कल्याण येथे व्यक्त केला.

निर्भय जर्नलिस्ट फाऊंडेशनच्या वतीने केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्याशी चर्चासत्र चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री पाटील यांनी आपला राजकीय प्रवास, त्यातील आठवणीतले मजेदार किस्से सांगितले. महागाई, ओबीसी आरक्षण याविषयी केंद्र सरकार नाही तर राज्य सरकार जबाबदार आहे. केवळ जनतेची दिशाभूल करायची काम करीत आहेत. मात्र जनता सुज्ञ असून पंतप्रधान मोदी आणि विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी आखलेल्या विकास कामांच्या मुद्द्यावर भाजपा निवडणूक लढेल व जिंकेल असे ते म्हणाले. राज्यसभा निवडणुक निकलानंतर संजय राऊत यांनी भाजप वर टीका करताना आमच्या हातात ईडी असती तर आम्हाला ही मतं मिळाली असती अस वक्तव्य केलं होतं याबाबत बोलताना संजय राऊत यांना इडीमुळे मते मिळाली का, राज्यसभेच्या निवडणुकीत झालेला विजय हा देवेंद्र फडणवीस यांच्या स्ट्रेटेजीचा विजय आहे. राऊत यांना निवडणूक स्ट्रेटेजी आणि निवडणुक लढवण्याचा अनुभव आहे की नाही याचा विचार करण्याची गरज आहे.

स्वतःची हार कुणाच्यातरी पाठीमागे लपवण्याचे काम करण्याची त्यांची पहिल्यापासूनची भूमिका आहे. अशाप्रकारे काही झालं तरी केंद्राकडे बोट दाखवणार, यामध्ये ईडी चा प्रश्न आला कुठून. त्यांच्या दोन आमदारांना हायकोर्टाने सुद्धा मतदानाचा हक्क नाकारला, हायकोर्ट सुद्धा इडीच्या सांगण्यावरून चालतं का ? असा सवाल पाटील यांनी केला. पुढे बोलताना पाटील यांनी मध्यंतरी राऊत यांनी न्यायालय भाजपच्या माणसांना जामीन देत आम्हाला नाकारत असं वक्तव्य केलं होतं त्यांना आता सवय झाली काही नाही झालं की ते केंद्र सरकार आणि भाजपा बोट दाखवायच यापलीकडे ते काही भाष्य करत नाहीत असा टोला लगावला.

राज्यसभा निवडणूक निकालानंतर महविकास आघाडीतील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अपक्ष आमदारांना निधी देताना विचार करू अस वक्तव्य केलं होतं. याविषयी मंत्री पाटील म्हणाले, अशा प्रकारे वक्तव्य करणारे मंत्री विधानपरिषदेत भाजपचे पाच उमेदवार निवडून आणण्यासाठी सहाय्य करतील असा याचा अर्थ आहे. राज्यसभा निवडणुकीत जी काही मतं भाजपच्या पारड्यात पडली ती महाविकास आघाडी सरकारवर नाराज असलेल्या आमदारांची होती. वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानंतर आणखी आमदार आमच्या बाजूने येत मतदान करतील, अपक्ष आमदारावर दबाव आणण्याचं काम आघाडी सरकारचा सुरू आहे. देशात लोकशाही आहे राज्यात लोकशाही आहे की नाही याबाबत विचार करावा लागेल.

आघाडी सरकारमधील मंत्री अशा प्रकारे वक्तव्य करत असतील तर ते दुर्दैव आहे. अपक्ष आमदार या वक्तव्याचा विचार करतील आणि भाजपाला मतदान करतील असेही ते म्हणाले. नवी दिल्ली येथे अखिल भारतीय लवणकार समाजाचे राष्ट्रीय संमेलन सोमवारी होणार आहे. यावेळी नवी मुंबई येथील नियोजित विमानतळाला आगरी समाजाचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा आग्रह समाजाकडून केला जात आहे. त्यासाठी राज्य सरकारवर दबाव वाढविण्यासाठी मेळाव्यात चर्चा केली जाणार असल्याचे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com