मुंबई - मकर संक्रांतीच्या दिवशी पतंगाच्या मांजामुळे मुंबईत तब्बल 550 पक्षी जखमी झाल्याची नोंद झाली. यातील 40 पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे पक्षिप्रेमी संस्थांनी सांगितले. गेल्या वर्षीच्या तुलनेत पक्षी जखमी होण्याचे प्रमाण 50 टक्क्यांनी कमी झाल्याचेही सांगण्यात आले.
मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी मुंबईत 250 पक्षी मांजामुळे जखमी झाले होते. आज सकाळपासून मांजाला अडकून जखमी पक्ष्यांची संख्या वाढत असल्याने पक्षिप्रेमी संस्था जागरूक होत्या. परळमधील बैलघोडा रुग्णालयात 22 कबुतरे, दोन घार, तीन कोकीळा, दोन पोपट आणि काही बगळे उपचारासाठी दाखल झाल्याची माहिती रुग्णालयाचे सचिव कर्नल जे. सी. खन्ना यांनी दिली. दरम्यान, मंगळवारी 500 हून अधिक पक्षी जखमी झाल्याची माहिती बर्ड हेल्पलाइन या पक्षिप्रेमी संस्थेचे प्रमुख हर्ष शाह यांनी दिली.
|