मराठा समाजाची संवाद यात्रा आज मुंबईत 

मराठा समाजाची संवाद यात्रा आज मुंबईत 

मुंबई - मराठा आरक्षणाबाबत स्पष्टता नसल्याने राज्यात सुरू असलेली मराठा समाजाची संवाद यात्रा सोमवारी मुंबईत दाखल होणार आहे. तर शेतीमालावरील निर्यात बंदी उठवावी, दुष्काळाचा राष्ट्रीय आपत्तीत समावेश करावा, आदी मागण्यांसाठी 13 संघटनांतर्फे निघालेला शेतकरी मोर्चा रविवारी ठाण्यात पोचला. सोमवारी तो मुंबईत धडकेल. 

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने मुंबईसह राज्यभरात मूक मोर्चे काढले, आंदोलनेही केली. समाजातील काही तरुणांनी आत्महत्या केल्यानंतरही आरक्षणाबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही, असे सांगत सांगलीतील मराठा समाजाने संवाद यात्रा काढली आहे. या यात्रेत या समाजातील सुमारे दहा हजार नागरिक सहभागी झाले आहेत. 

दुसरीकडे, शेतमालास हमीभाव, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी, शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा, शैक्षणिक शुल्कात सरसकट सवलत आदी मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे 13 संघटनांच्या नेतृत्वाखाली शेतकरी मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाला रविवारी ठाण्यातील आनंदनगर येथे रोखण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com