बळीराजाची भूक पनवेलकर शमवणार; 1 लाख भाकऱ्या, 500 किलो सुकट रवाना

panvel
panvel

ठाणे : देशातील जनतेचं पोट भरण्यासाठी रात्रंदिवस राबणारा शेतकरी बांधव आज स्वत:च्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला आहे. पाच दिवस पायपीट करत १८० किमीहून अधिक अंतर कापत मुंबईत दाखल झालेल्या या शेतकरी मोर्चेकऱ्यांच्या जेवणाचं काय असा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर इथे मिळेल. शेतकरी बांधवांसाठी पनवेल आणि आसपासच्या गावांमधून तब्बल १ लाख भाकऱ्या आणि ५०० किलो सुकट असं भोजन ग्रामस्थांनी बनवून मुंबईकडे रवाना केलं आहे.

शेतकरी कामगार पक्षानं (शेकाप) शेतकऱ्यांच्या या भोजनाची व्यवस्था केली आहे. त्यासाठी स्थानिक सरपंचांना सांगून भाकऱ्या बनवून घेतल्या आहेत. प्रत्येक सरपंचाला भाकऱ्यांचं टार्गेट देण्यात आलं होतं आणि त्यांनीही ते आनंदानं स्वीकारलं. त्यानुसार १ लाख भाकऱ्या बनविण्यात आल्या आहेत. त्याचं संकलन करण्यात आलं आहे. तसेच कर्नाळा स्पोर्टस क्लबजवळ सुकटीचे कालवण बनवून ते मुंबईला रवाना करण्यात आलं आहे. हे भाकऱ्या आणि सुकटीचे कालवण घेऊन निघालेले ट्रक लवकरच मुंबईत दाखल होतील.

दरम्यान, याआधी मुंबईकरांनी देखील पाणी, बिस्किट तसेच काही ठिकाणी अन्न पदार्थांचे वाटप करून शेतकरी बांधवांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com