ठाणे: जन्म नोंदणीची अखेरची संधी

Thane
Thane

ठाणे : शाळा-महाविद्यालयात प्रवेश असो कि,नोकरी तसेच, आयुष्यातील अनेक बाबींसाठी अथवा परदेश गमनासाठी जन्म दाखल्याच्या आवश्यकता भासते. पूर्वीच्या तुलनेत सद्यस्थितीत आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या जन्म दाखल्यांसाठी सर्वच आग्रही असतात. तेव्हा,1969 पूर्वी अथवा नंतर नावाशिवाय केवळ जन्माची नोंद झालेल्या नागरिकांना आपल्या जन्माची नोंद करून दाखला मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. याबाबतचा अध्यादेश जारी करण्यात आला असला तरी ही अखेरची संधी असून 14 मे 2020 सालानंतर वंचित राहिलेल्यांना जन्म नोंदणी करता येणार नाही.असे निर्देश राज्याच्या आरोग्य सेवा उपसंचालकांनी दिले आहेत.       

पूर्वीच्या काळी गर्भवती मातांसाठी प्रसूती व्यवस्था नसल्याने घरातच प्रसूती होत असे.त्यामुळे बाळाच्या जन्माची नोंद करण्याचे सायास कुणी घेत नसत. तर,शहरी भागातही प्रसूतीगृहात जन्माला आलेल्या बाळांच्या जन्माची नोंद रूग्णालयामार्फत होऊनही अनेकांनी जन्म दाखले घेतलेले नसत.त्यामुळे,नावाशिवाय केवळ जन्माची नोंद झालेल्या नागरिकांना जन्म नोंदणीमध्ये नावाची नोंद करून जन्मदाखले मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. शासनाच्या आरोग्य सेवा विभागाचे उपसंचालक तथा राज्याचे जन्म-मृत्यू उपमुख्य निबंधकांनी एका अधिसुचनेद्वारे ज्या नागरिकांची जन्माची नोंदणी 1 जानेवारी 2000 पूर्वी झालेली आहे,ज्यांच्या नोंदणीला 15 वर्षाचा कालावधी लोटला आहे. अशा सर्व नागरिकांना जन्म नोंदणीची संधी मिळणार आहे. किंबहुना सन 1969 पूर्वी नोंदणी केलेल्या व्यक्ती अथवा त्यांच्या पालकांना जन्म नोंद करता येणार असून ही मुदत केवळ 14 मे 2020 पर्यंतच उपलब्ध असेल.त्यानंतर हा कालावधी कुठल्याही परिस्थितीत वाढवून मिळणार नाही.अशी सुचना देण्यात आली आहे. त्यासाठी नागरिकांनी नावाच्या खात्रीसाठी शाळा सोडल्याचा दाखला,शैक्षणिक प्रमाणपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड, आधारकार्ड यापैकी एका पुराव्यासह जन्म व मृत्यू नोंदणी कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे.

नवजात बालकांसाठी वर्षभराच्या आता मोफत जन्म दाखल्याची प्रथम प्रत मोफत आणि पुढील प्रत्येक प्रतीसाठी 20 रुपये नाममात्र शुल्क आकारण्यात येते.त्याच धर्तीवर आता अर्ज करणाऱ्या नागरिकांनाही 20 रुपये शुल्क आणि अवघे 5 रुपये विलंब शुल्क आकारून जन्म नोंदीचे प्रमाणपत्र मिळणार असल्याची माहिती ठाणे महापालिका जन्म व मृत्यू विभागाकडून देण्यात आली.

ठाणे महापालिकेद्वारे जन्म नोंदीपासून वंचित नागरिकांना नेहमीच विनामुल्य सहकार्य केले जाते.तरीही,जन्म नोंदीची नोंद पालिकेच्या रजिस्टरमध्ये नसल्यास जन्म व मृत्यू विभागाकडून अनुलब्धता प्रमाणपत्र घेवून जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 चे कलम व महाराष्ट्र जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम 2000 नियम 10 नुसार न्यायालयीन प्रक्रियेद्वारे मिळवता येईल.
- विनय पाटील – उपनिबंधक,ठामपा जन्म-मृत्यू विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com