मेट्रो खांबाच्या कामामुळे  वीजपुरवठ्यावर परिणाम?

मेट्रो खांबाच्या कामामुळे  वीजपुरवठ्यावर परिणाम?

मुंबई - मेट्रो-२ अ मार्गावर विक्रोळीतील कामराजनगरमध्ये खांब उभारण्याच्या कामामुळे कांदिवली पश्‍चिम आणि अंधेरी पश्‍चिम भागात वीजपुरवठा खंडित होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी टाटा पॉवर आणि अदानी इलेक्‍ट्रिसिटी कंपन्या पर्यायी यंत्रणा वापरून वीजपुरवठा सुरू ठेवण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्याचे काम मध्यरात्री केले जाणार असल्याने नागरिकांना त्रास होण्याची शक्‍यता आहे. 

दहिसर ते डीएननगर मेट्रो २ अ मार्गावर कामराजनगरमध्ये खांब उभारण्यात येत आहे. त्यामुळे १३ व १४ जुलै आणि २० व २१ जुलैला मध्यरात्री १२ पासून सकाळी ६ वाजेपर्यंत कांदिवली, मालाड, गोरेगाव आणि अंधेरी पश्‍चिम परिसरातील वीजपुरवठा खंडित होण्याची  शक्‍यता आहे. 

पर्यायी व्यवस्था करण्यात आली असली, तरी ऐनवेळी अडचणी निर्माण झाल्यास काही काळासाठी वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. त्यामुळे टाटा व अदानी वीज कंपन्यांच्या ग्राहकांना पूर्वसूचना देण्यात येत असल्याचे एमएमआरडीएचे प्रवक्ता दिलीप कवठकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com