मुंबई - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता रविवारी (ता. 26) समाप्त झाली. त्यानंतर लगेचच सोमवारी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील (म्हाडा) 144 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. आचारसंहितेमुळे दीड महिन्यापासून बदली आणि बढतीची प्रक्रिया रखडली होती.
'म्हाडा'च्या मुंबई, कोकण, पुणे, औरंगाबाद आदी सर्व मंडळांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश आज निघाला. "म्हाडा'चे बहुतेक अधिकारी व कर्मचारी लोकसभा निवडणुकीच्या कामात व्यग्र होते. ही कामे संपल्यावर ते आजपासून नियमित कामासाठी रुजू झाले. त्यापैकी अनेकांना त्याच दिवशी सायंकाळी बदल्यांचा आदेश मिळाला. त्यामुळे त्यांना तातडीने नव्या ठिकाणी पदभार स्वीकारावा लागेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
|