मनसेकडून बंदचे आवाहन; गरज असेल तरच घराबाहेर पडा

Raj-Thackeray.
Raj-Thackeray.

ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावल्यानंतर आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी ठाणे बंदचं आवाहन केलं आहे. येत्या 22 ऑगस्टला ठाण्यातील मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे 22 ऑगस्टला गरज असेल, तरच घराबाहेर पडा, असा इशाराही मनसे कार्यकर्त्यांनी नागरिकांना दिला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी यांना कोहिनूर प्रकरणात ईडीने नोटीस बजावून त्यांना 22 ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दादरमधील कोहिनूर मिल क्रमांक तीन विकत घेण्यामध्ये राज ठाकरे यांची भूमिका असून यासाठीच ते ईडीच्या रडारवर होते. मात्र, या नोटीसनंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. 

राज ठाकरे यांना 22 तारखेला चौकशीसाठी बोलावलं, तर ठाणे बंद करू, असं मनसेचे ठाणे, पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले. तसेच 'प्रेमाने बंद केलं तर स्वागत, नाहीतर कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल,' असा इशारा त्यांनी दिला. राज्यात त्यादिवशी जे घडेल, त्याला सरकार जबाबदार असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com