'कोरोनाचं महाराष्ट्रावर प्रेम आहे की, महाराष्ट्र सरकारच कोरोनावर प्रेम आहे?', मनसेचा सवाल

raj-thackeray.jpeg
raj-thackeray.jpeg

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. लग्नसोहळे, अंत्ययात्रा ते कार्यालयीन उपस्थितीवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. लग्नाला ५०, अत्यंयात्रेला २० तर कार्यालयात फक्त ५० टक्के स्टाफला उपस्थित राहण्याची परवानगी आहे. मुंबईत मागचे तीन दिवस दीडहजारपेक्षा जास्त कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी अंशत: लॉकडाउनचा इशारा दिला आहे. 

मुंबईसह महाराष्ट्रात नव्याने निर्बंध घालण्याचा राज्य सरकारचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पटलेला नाही. मनसेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थितीचा निर्णय घेतला, मग सरकार ५० टक्के टॅक्स कमी करणार का? नोकरी, व्यवसाय नाही केले, तर लोकांनी पैसे कुठून भरायचे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

आधी सरकारने वीज तोडणी थांबवावी. तुमची घाणेरडी प्रकरण बाहेर येतात ? म्हणून लॉकडाउन लावत का? असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला आहे. महाराष्ट्राला लागून असलेली राज्य गोवा, गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश आंध्र प्रदेश इथे करोना वाढत नाही. पण महाराष्ट्रात कसा वाढतो? असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com