महामुंबईतून पाऊस परतीच्या प्रवासाला 

महामुंबईतून पाऊस परतीच्या प्रवासाला 

मुंबई - महामुंबईतून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला आहे. पुढील तीन दिवस पावसाची शक्‍यता नसून, तापमान 36 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्‍यता आहे. 

मुंबईसह महामुंबईतून सोमवारपासून पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला. दरवर्षी 1 ऑक्‍टोबरच्या सुमारास मुंबईतून पाऊस परतीच्या प्रवासाला निघतो; त्यासाठी यंदा 13 दिवस उशीर झाला आहे. परंतु, महामुंबईत पुढील काही दिवस पावसाची शक्‍यता नाही. 

सोमवारी डहाणू येथे 34.9 आणि 25.2 अंश, अलिबाग येथे 34.3 आणि 25.5 अंश, ठाण्यात 35 आणि 25.6 अंश अनुक्रमे कमाल आणि किमान तापमानाची नोंद झाली. आणखी काही दिवस अशीच परिस्थिती राहील. 

पुढील दोन दिवस पावसाची शक्‍यता नसून, त्यानंतर तुरळक सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 

तापमानात होणार वाढ 
सोमवारी सांताक्रूझ येथे 35.9 अंश कमाल आणि 25.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. पुढील 48 तासांत तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com