सबलीकरण योजनेसाठी अलिबागमध्‍ये मोर्चा

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना

महाड (बातमीदार) : सामाजिक न्याय विभागाकडून राबवली जाणारी दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेची राज्य सरकारच्या समाजकल्याण विभागाकडून योग्य अंमलबजावणी होत नसल्याने ही योजना तळागाळापर्यंत पोहचलेली नाही. यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती आणि आदिवासी लाभार्थींना पुढे आणण्याचे काम भीम शक्ती या सामाजिक संस्थेकडून झाले. मात्र, अंमलबजावणी करताना समाजकल्याण विभागाकडून उदासीनता जाणवत असल्याने १६ सप्टेंबरला अलिबाग येथे मोर्चा करणार असल्याची माहिती उमेश लांगी यांनी दिली.

या मोर्चाचे नेतृत्व भीम शक्तीचे प्रदेश सरचिटणीस गोपाल तंतरपाळ हे करणार आहेत. सामाजिक न्याय विभागाकडून २००४-०५ मध्ये कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नावाने दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना सुरू केली. या योजनेतून दारिद्य्र रेषेखालील भूमिहिनांना सरकार कोरडवाहू आणि बागायती जमीन दिली जाणार होती. सुरुवातीला या योजनेसाठी ५० टक्के अनुदान देण्यात येणार होते. मात्र, आता यात बदल करून लाभार्थीला १०० टक्के अनुदान मिळणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीत सरकारी यंत्रणा उदासीन असल्याने भीम शक्तीने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार तालुक्‍यातून जवळपास ३०० अर्ज सादर करण्यात आले आहेत. त्यातून ९० पेक्षा अधिक अर्ज मंजूरही झालेत. अलिबाग येथील समाजकल्याण अधिकारी याबाबत उदासीन असल्याने १६ सप्टेंबर रोजी त्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती उमेश लांगी यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com