मुंबई - मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात आणखी गती आणून कामाचा दर्जा सुधारावा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. तसेच कोकणी जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका. कोणाच्याही चुकांमुळे सामान्य जनतेला त्रास झाल्यास सरकार अतिशय कडक कारवाई करेल, असे खडे बोल मंत्री पाटील यांनी या वेळी कंत्राटदार व अधिकाऱ्यांना सुनावले.
गेले दोन दिवस, भरपावसात मंत्री पाटील यांनी रत्नागिरी व रायगड येथील रस्त्यांची आणि चिपळूण ते वडखळ या राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाची पाहणी केली. यानंतर कंत्राटदारांच्या काही ठिकाणी अवलंबिलेल्या ढिसाळ कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत, महामार्ग अधिकारी वर्गाने अधिक परिणामकारक व जातीने देखरेख करण्याच्या सूचना दिल्या.
|