मुंबई - उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांना बुधवारपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. येत्या आठवड्यात कमाल तापमान 30 अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित राहील, असा अंदाज केंद्रीय वेधशाळेने वर्तवला आहे. मार्चच्या पहिल्या पंधरावड्यापर्यंत कमाल तापमान 30 अंशांवर जाणार नाही, असा अंदाज स्कायमेटनेही वर्तवला आहे.
मुंबई, ठाणे, कल्याण परिसरातील उकाडा काहीसा कमी झाल्याचे आढळले. मुंबईत गुरुवारी कमाल तापमान 29 अंश आणि किमान तापमान 20 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. बोरिवली, गोरेगाव, दहिसर, घोडबंदर, येऊर, ठाणे या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या परिसरात 18 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. परंतु, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रात किमान तापमान 30 अंशांच्या वर होते. राज्यात सर्वाधिक तापमान अकोला येथे 33 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. तापमानात चढउतार होत असल्यामुळे सर्दी, घसा दुखणे व अन्य आजार होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेषत: ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, दमा व फुफ्फुसाचे आजार असणाऱ्या व्यक्तींनी काळजी घेणे आवश्यक आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.
सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.