पावसाळ्यात मुंबईतील गल्लीबोळ तुंबणार 

File photo of Mumbai Rains
File photo of Mumbai Rains

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लहान नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम फक्त 20 टक्के झाले आहे. मोठ्या नाल्यांतील सुमारे 40 टक्के गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे लहान नाल्यांतील उर्वरित 80 टक्के गाळ काढण्याचे काम 30 मेपर्यंत पूर्ण करण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे. 

मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यापर्यंत नाल्यांतील गाळ काढण्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित असते. यंदा मोठ्या नाल्यांमधून तीन लाख 34 हजार टन आणि लहान नाल्यांमधून दोन लाख सहा हजार टन गाळ पावसाळ्यापूर्वी काढावयाचा आहे. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी नालेसफाई आणि गाळ काढण्याच्या कामांचा आढावा नुकताच घेतला. गटारांवरील (मॅनहोल) झाकणे आणि जाळ्या व्यवस्थित लावण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. 

छोट्या नाल्यांची रुंदी तीन मीटरपेक्षा कमी असते. हे छोटे नाले रस्त्याच्या बाजूला असलेल्या पर्जन्यवाहिन्यांमधील पाणी मोठ्या नाल्यांपर्यंत वाहून नेतात. पावसाळ्यापूर्वी या नाल्यांमधील दोन लाख सहा हजार 185 टन गाळ काढावयाचा होता. त्यापैकी 41 हजार 925 टन गाळ काढण्यात आला आहे.

मोठ्या नाल्यांमधील एक लाख 48 हजार टन गाळ काढण्यात आला आहे. मिठी नदीतील 90 हजार 426 टन गाळ काढावयाचा होता. त्यातील 44 हजार टन गाळ काढण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com