Mumbai News : अधिवेशनात आश्वासनानंतरही महावितरणात नियुक्तीसाठी उमेदवार प्रतिक्षेत

Mumbai News
Mumbai News

मुंबई : महावितरण विभागाने २०१९ मध्ये उपकेंद्र सहाय्यक (आॅपरेटर) २३०० पदाची भरती काढली होती. ज्यामध्ये १०२९ मुलांची वेटिंग लिस्ट जाहीर केली. त्यापैकी ७५७ उमेदवार यांना नियुक्ता दिल्या नाही. यासंदर्भात आमदार बच्चु कडू यांनी हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता.

दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री तथा उर्जा मंत्री देवेंद्र फडणविस यांनी सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन सुद्धा दिले होते. मात्र त्यानंतही पाच वर्ष होऊनही नियुक्ती मिळत नसल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या युवकांनी आझाद मैदानावर उपोषणाला सुरूवात केली आहे.

वर्ष २०१९ मध्ये या उमेदवारांची परिक्षा झाली, कोरोना महामारीमूळए आणि सत्तांतरामूळे दरम्यानच्या काळात जुन २०२० मध्ये निकाल लावण्यात आला आणि वेटिंगची यादी जाहीर करण्यात आली. दरम्यान मराठा आरक्षणामुळे स्थगिती देण्यात आली आहे. त्यामूळे ९ सप्टेंबर २०२० मध्ये एसईबीसी आणि आर्थीक मागासवर्गीयांना वगळून पात्र उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या.

मात्र, त्यानंतर आता महावितरण विभागाने समांतर आरक्षण लावून वेटिंगमधील ७५७ उमेदवारांना गेल्या पाच वर्षांपासून नियुक्त्याच दिल्या नसल्याचे दिसून येत आहे. सध्या स्थितीत महावितरण विभागात सुमारे उपकेंद्र सहाय्यक पदाच्या ७००० पेक्षा अधिक जागा रिक्त आहे. त्यामूळए ७५७ उमेदवारांना तातडीने नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्या उमेदवारांकडून केली जात आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी बहुल क्षेत्रातील भैय्या कुडमाथे यांच्या घरातील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. शेती किंवा खासगी काम केले तर घरातील कुटूंबाचा उदरनिर्वाह चालेल, त्यात भैय्या थोडाफार शिकून आयटीआय करून महावितरणाच्या विभागाची परिक्षा दिली, निवड सुद्धा झाली मात्र, नियुक्तीच मिळत नसल्याने त्याची मानसिकता खराब झाली आहे.

तहाण-भुक लागत नाही. सारखा विचारकरून बडबडत असल्याचे भैय्याचे सहकारी सांगतात. आंदोलनात भैय्याचा सक्रिय सहभाग असल्याने मंगळवारी भोवळ येऊन पडल्याने जिटी रुग्णालयात त्याला आता भर्ती करण्यात आले आहे.

राज्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देणाऱ्या सभागृहात लोकप्रतिनीधीं प्रश्न उपस्थित केला, त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक आश्वासन सुद्धा दिले. त्यानंतरही त्याची अंमलबजावणी होऊ नये, लाजीरवानी गोष्ट आहे. गोरगरीब शेतकऱ्यांची आम्ही पोर आहे. हातावर कमावणे आणि खाने अशी दिनचर्या आहे. नौकरीच्या प्रतिक्षेत लग्न सुद्धा जुळत नसून, आई-वडील सुद्धा नौकरीच्या प्रतिक्षेत आहे. सरकारने आम्हाला न्याय द्यावा.

- विजय डोंगरे, उमेदवार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com