जनहित याचिका दाखल करणार - विखे पाटील 

जनहित याचिका दाखल करणार - विखे पाटील 

मुंबई - कमला मिलमधील अग्नितांडवाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करण्याच्या मागणीसाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याची घोषणा आज केली. पुढील आठवड्यात ही याचिका दाखल केली जाईल. 

विखे पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत कमला मील कंपाउंड परिसरातील अग्नितांडवावरून सरकारवर जोरदार तोफ डागली. ते म्हणाले, की सरकारने या घटनेच्या चौकशीची जबाबदारी मुंबई पालिका आयुक्तांवर सोपवली आहे. परंतु ज्या घटनेसाठी महापालिकेचा भ्रष्टाचार, सरकारची उदासीनता आणि आयुक्तांची निष्क्रियता कारणीभूत आहे; त्या घटनेची चौकशी आयुक्तांकडे सोपवणे म्हणजे चोराच्या हातात तिजोरीच्या किल्ल्या देण्यासारखे आहे. खरे तर सर्वांत पहिले आयुक्तांविरुद्ध 302 दाखल करून त्यांना निलंबित करायला हवे होते, परंतु त्यांच्याकडेच चौकशी सोपवली जाते, ही वैचारिक दिवाळखोरी आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com