महाखादी महाराष्ट्राचा आत्मसन्मान जागृत करेल- राज्यपाल

महाखादी महाराष्ट्राचा आत्मसन्मान जागृत करेल- राज्यपाल

मुंबई : राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाने काढलेली महाखादी यात्रा ग्रामीण उत्पादनांना जागतीक बाजारपेठ मिळवून देत उद्योजकांना आत्मसन्मान वाढविण्यास मदत करेल म्हणून ही यात्रा एक लोकचळवळ होईल, असा विश्वास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केला.

राजभवन मुंबई येथे खादी ग्रामोद्योग मंडळाच्या महाखादी यात्रेचा शुभारंभ राज्यपाल यांच्या हस्ते झाला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
मंडळाचे सभापती विशाल चोरडीया यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही यात्रा राज्यातील वीस जिल्ह्यात जाणार असून प्रत्येक जिल्ह्यात तीन दिवसांचा खादी व ग्रामोद्योगी उत्पादनांचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. ही यात्रा मुंबई राजभवन ते नागपूर राजभवन अशी पंच्चाहत्तर दिवस चालणार आहे. मंडळाच्या आज अखेरच्या कारकिर्दीत अशी यात्रा प्रथमच काढण्यात येत आहे. 

या कार्यक्रमास वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, गृहराज्यमंत्री दिपक केसरकर,उद्योगराज्यमंत्री प्रविण पोटे पाटील, मंडळाचे सभापती विशाल चोरडिया, वर्धा आश्रमाचे जयवंत मठकर, टी. करुणाकरन, मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रिचा बागला, शिवाजी दौंड, श्वेता चोरडीया यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल पुढे म्हणाले "खादी हे केवळ एक वस्त्र नसून तो विचार आहे. मंडळाने महाखादी हा ब्रँन्ड बनवून ग्रामोद्योगास जागतीक बाजारात मान्यता मिळवून देण्यासाठी सुरु केलेले प्रयत्न प्रशंसनिय आहेत. मंडळाची सर्व कामे कल्याणकारी आहेत.
यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी सांगीतले राज्य शासन मंडळाच्या पाठीशी असून ग्रामिण भागाच्या विकासाला प्राधान्य देण्यात येईल. खादी व ग्रामोद्योगाचे चांगले मार्केटींग होण्यासाठी महाखादी हा ब्रँन्ड यशस्वी होईल.

दीपक केसरकर यांनी शुभेच्छा देताना मंडळाच्या महाखादी या ब्रँडचा लोकांना फायदा होईल व ग्रामीण भागातील सर्व उत्पादने शहरातील लोकांना मिळतील त्यामुळे ग्रामोद्योगाची बाजारपेठ विस्तारेल असे सांगितले.
प्रविण पोटे पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
मंडळाचे सभापती विशाल चोरडीया यांनी महाखादी यात्रेची संकल्पना विषद करताना सांगीतले कि " गेल्या वर्षभरापासून राज्यातील ग्रामिण उद्योजकांच्या उद्योगांना भेटी देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यावेळी बाजारपेठ ही मोठी समस्या उद्योजकांना असल्याचे लक्षात आले आणि यातुन सर्व उद्योजकांना उपयोगी पडेल असा महाखादी हा ब्रँन्ड विकसीत करण्यात आला. हा ब्रँन्ड लोकांपर्यत पोहचावा आणि ग्रामीण उद्योजकांना हक्काची बाजारपेठ मिळावी शिवाय खादी चे महत्व जनमानसात रुजावे यासाठीच महाखादी यात्रा काढण्यात आली आहे".
मुख्य कार्यकारी अधिकारी डाँ रिचा बागला यांनी मंडळाच्या योजनांचे सविस्तर सादरीकरण केले. या वेळी राजभवन येथे विविध चरखे आणि मधमाशापालनाच्या साहीत्याचे प्रदर्शनही आयोजित केले होते. मान्यवरांनी महाखादी यात्रेच्या बस ला हिरवा झेंडा दाखवून यात्रेचा शुभारंभ केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप यांनी केले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com