संविधान बदलल्यास सरकार बदलू: रामदास आठवले

संविधान बदलल्यास सरकार बदलू: रामदास आठवले

मुंबई - संविधान कधीही बदलले जाणार नाही. तसा प्रयत्न कोणत्याही सरकारने केला, तर ते सरकारच बदलण्यासाठी आम्ही अग्रेसर राहू, असा इशारा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दिला.

भाजप नेते अनंतकुमार हेगडे यांच्या संविधान बद्दलण्याबाबतच्या वक्तव्याचा त्यांनी निषेध केला आहे. हेगडे यांच्या मताशी आपण आणि केंद्र सरकार सहमत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आठवले म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार संविधान बदलण्यासाठी नाही, तर संविधान आणि दलित आदिवासींच्या आरक्षणाला मजबूत करण्यासाठी कार्यरत आहे. मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून संसदेतही आपण संविधानाच्या रक्षणासाठी दक्ष आहोत. केंद्र सरकारने 26 नोव्हेंबरला देशभर "संविधान गौरव दिन' साजरा केला. त्यासाठी सरकारने संसदेत दोन दिवसांचे स्वतंत्र अधिवेशन घेतले, असे स्पष्टीकरण देत संविधानविरोधी वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही.

भाजप खासदार उदीत राज यांनीही हेगडे यांच्या विधानाचा निषेध केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com