मुंबई-ठाण्यातील तापमान फरकावर शंका 

मुंबई-ठाण्यातील तापमान फरकावर शंका 

मुंबई - मुंबईच्या तापमानातील वाढ मंगळवारीही (ता. 12) कायम राहून 36.3 अंश सेल्सिअस अशा राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. परंतु, ठाण्यातील कमाल तापमान 32 अंश नोंदवले गेल्यामुळे या प्रक्रियेबाबत शंका उपस्थित केली जात आहे. 

रायगड जिल्ह्यातील भिरा येथील कमाल तापमान सातत्याने 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवले जात होते. परंतु, तेथून जवळ असलेल्या स्थानकातील कमाल तापमानाच्या नोंदी चार ते पाच अंशांनी कमी असल्याचे आढळले. त्यामुळे पुणे वेधशाळेने मागील वर्षी मे महिन्यात भिरा येथील तापमानाची नोंद वर्षभरासाठी बंद केली. याबाबत वेधशाळेतील अधिकारी तपास करत आहेत. 

ठाणे आणि मुंबईतील तापमानाच्या नोंदीतही कित्येकदा असा गोंधळ आढळतो. या दोन ठिकाणी मंगळवारी कमाल तापमानात चार अंशांचा फरक आढळला. नवी मुंबईतील रबाळे येथील स्थानकातून ठाणे येथील कमाल तापमानाची नोंद केली जाते. या फरकाबाबत मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. 

उष्ण वाऱ्यांचा प्रभाव 
पूर्वेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांचा प्रभाव मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर असल्यामुळे शनिवारपासून (ता. 9) कमाल तापमानात वाढ सुरू आहे. आणखी दोन दिवस हाच कल कायम राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण किनारपट्टीवर कमाल तापमान सरासरी 30 अंश नोंदवले गेले. मंगळवारी कुलाबा केंद्रात 34 अंश, तर सांताक्रूझ केंद्रात 36.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कमाल तापमान डहाणूत 29 अंश आणि अलिबागमध्ये 30 अंश सेल्सिअस होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com