मुंबई - मुंबई शहर व उपनगराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील उपयुक्त साठ्यामध्ये आतापर्यंत सुमारे 50 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे, त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने गेल्या वर्षीपासून शहरात उपनगरामध्ये केलेली 10 टक्के पाणी कपात, तसेच पाणीपुरवठ्याच्या वेळेतील कपात रद्द करावी, अशी सूचना नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी केली आहे.
मुंबई शहर व उपनगराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावामध्ये गेल्या वर्षी पाणीसाठा कमी झाला होता, त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने पाणीपुरवठ्यामध्ये 10 टक्के कपात केली होती. तसेच, पाणीपुरवठ्याच्या वेळेतही 15 टक्के कपात केली आहे. त्यामुळे उपनगरातील नागरिकांना अडचणी निर्माण होत आहेत. पाणी कपात रद्द व्हावी, याविषयी नगरविकास राज्यमंत्री सागर यांनी वारंवार पाठपुरावा केला होता.
|